१.
मी पहाडाखाली ओणवा होवून जातांनापहाड कोसळेलसे सारखे वाटत रहाते
तुझे तर पाऊल रोवले नाहीस ना त्यावर
मरणही सुगंधित होते म्हणतात ते असे!
२.
काळजावर कातडी असते
हे किती चांगले!
एरवी ह्या कवितांनाही
काळोख आणि उजेडाचे
अर्थ कळले नसते.
३.
तळाशी बुडून जाण्यापेक्षा विरघळून जावे
मिसळण्याचे अर्थ कळतात निदान सरल्यावर
मरणापूर्वी एकदाच मिठीचा मोर नाचव प्रेमणा
जिवंत अलिंगनापेक्षा मरणाची मिठी
कितीतरी सार्वभौम असते...
(आभाळाचा अनुस्वार)
No comments:
Post a Comment